८३. आणि जेव्हा त्यांना एखादी खबर शांती या भीतीची पोहोचते, ते लगेच तिचा प्रचार करायला सुरुवात करतात. जर यांनी ती खबर पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्यापर्यंत पोहचविली असती किंवा आपल्यातल्या जबाबदार लोकांच्या कानावर टाकली असती तर तिची जाच-पडताळ करणाऱ्यांनी तिची खरी हकीकत माहिती करून घेतली असती. आणि जर अल्लाहची कृपा आणि त्याची दयादृष्टी तुमच्यावर राहिली नसती तर काही लोकांना सोडून तुम्ही सर्व सैतानाच्या मागे चालणारे बनले असते.